‘या’ क्रिकेटर सोबत अफेयर आणि लग्नानंतर ‘हि’ एकटी आहे ‘हि’ प्रसिद्ध अभिनेत्री, आता जगात आहे असे जीवन

प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार असतात. मग तो सामान्य माणूस असो वा सेलिब्रिटी. आज आपण अशा बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमकथेबद्दल बोलू जिची ओळख तिच्या कामापेक्षा कमी आणि प्रेमकथेमुळे जास्त आहे. होय, आम्ही बोलत आहोत अभिनेत्री रीना रॉय बद्दल. जेव्हा रीना रॉय यांचे नाव येते तेव्हा बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांचे नाव आपोआपच जोडले जाते. दोघांच्याही प्रेमकथांच्या चर्चा आजतागायत आहेत. तथापि, दोघांनीही कधीही त्यांच्या प्रेम प्रकरणाचा उघडपणे स्वीकार केलेला नाही. शत्रुघ्न सिन्हा आपले सुखी वैवाहिक जीवन आणि कुटुंबासह पुढे गेले आहेत, तर रीना रॉय देखील आपल्या मुलीबरोबर स्थायिक झाली आहे.
रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या.प्रेमसंबंधांवर कधीच स्वीकृती दिली नाही किंवा शिक्कामोर्तब केले नाही.मात्र यानंतर रीना रॉय आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसीन खानच्या प्रेमसंबंधांना सुरुवात झाली आणि त्यांचे लग्न झाले. तथापि, आता दोघेही विभक्त झाले आहेत. रीना राँय सध्या 70 वर्षांच्या आहेत. तर मग जाणून घेऊया रीना रॉय आणि मोहसीन खान यांच्या प्रेमकहाणी विषयी आणि ते का विभक्त झाले याच्या कारणांविषयी.
असं म्हणतात की रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांचे अफेअर 7 वर्षे चालले मात्र, शत्रुघ्न सिन्हाचे लग्न झाले होते. त्याचवेळी रीना रॉय यांनाही सेटल व्हायचं होतं. जेव्हा तिचे फिल्म इंडस्ट्रीमधील करिअर यशाच्या शिखरावर होत तेव्हा तिने ठरवले की ती मोहसिन खानशी लग्न करेल. मोहसिनच्या अफेयरनंतरच रीना रॉयने त्याच्याशी लग्न केले. लग्नानंतर रीना रॉय पतीबरोबर स्थायिक झाली. लग्नानंतर मोहसीन खाननेही क्रिकेटला निरोप घेऊन चित्रपटांवर आपले नशीब आजमावले.
रीना आणि मोहसीन यांना जन्नत नावाची एक मुलगी आहे. मोहसीनला आपल्या कुटुंबासमवेत लंडनला जायचे होते. तथापि, रीनाने हे मान्य केले नाही. तिला लंडनमध्ये खूप एकटे वाटत असे.
मोहसीन ची जीवनशैली रीनाला फारशी पसंत नव्हती. या संबंधात फारच त्रास होऊ लागल्यावर तिने आईला विचारले की आपण काय करावे. त्यानंतर तिच्या आईने तिला लग्नात संयम साधाण्याचा सल्ला दिला. बर्याच प्रयत्नांनंतरही जेव्हा रीना रॉय आपल्या लग्नात आनंदी होऊ शकली नाही तेव्हा तिने मोहसीन खानला घटस्फोट देऊन भारतात परत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र घटस्फोट घेतल्यानंतर रीना रॉय यांना मुलगी जन्नतचा ताबा मिळाला नाही. जन्नतबरोबर काही काळानंतर मोहसीनही कराचीला गेले.

आपल्या मुलीचा ताबा मिळवण्यासाठी लांबलचक लढा देऊन रीना रॉयने तिला ताब्यात घेतले.मोहसीन खान यांचेही त्यानंतर तीन विवाह झाले. मुलीला ताब्यात घेतल्यानंतर रीना रॉय यांनी आपल्या मुलीचे नाव जन्नत वरून सनम केले. सनम तेरी कसम या सुपरहिट चित्रपटाच्या नावावरून त्यांनी हे नाव ठेवले.

घटस्फोटानंतर रीनाने बॉलिवूडमध्ये परतण्यासाठी खूप प्रयत्न केले पण ती यशस्वी झाली नाही. ब-याच वर्षांनंतर तिला चित्रपटात एक छोटीशी भूमिका मिळाली. सध्या रीना आपली मुलगी सनमसमवेत मुंबईत एक अॅक्टिंग स्कूल चालवते व एकटीच आहे.