लग्न झालेले असून देखील या कलाकरांचा जडला दुसऱ्या मुलींवर जीव .. कोण आहेत ते कलाकार

कलाकार असो किंवा इतर कोणी नातं हे सर्वांसाठीच खूप महत्वचाच असतं. आपल्या भारतीय संस्कृतीत तर पती – पत्नीच्या नात्याला खूप महत्व देण्यात आले आहे. आपण आपल्या आजूबाजूला देखील अशी कितीतरी नाती पाहतो जी कित्येक वर्ष अगदी जशीच्या तशी असतात. पण बॉलीवुड हे असे आहे जेथे कोणाच नातं कोणाशी , कधी , केव्हा जोडलं जाईल. ते किती दिवस टिकेल आणि कधी काय होईल हे सांगता येतं नाही. आता हेच पहा बॉलीवुड मध्ये असे देखील अनेक कलाकार आहेत ज्यांचे वैवाहिक आयुष्य अगदी व्यवस्थित सुरू असताना त्यांच्या आयुष्यात तिसरं कोणी आलं आणि अगदी त्यांच आयुष्य बदलून जातं. आज आपण असेच काही अभिनेते पाहणार आहोत , ज्यांच्या आयुष्यात तिसरी व्यक्ति आली आहे.
फराह खान – फराह खान एक गुणी अभिनेता आहे. त्या बरोबरच तो एक चांगला माणूस देखील आहे तो एक चांगला दिग्दर्शक देखील आहे परंतु त्यांचे वैवाहिक जीवन काही नीट नाही. फराहने तब्बल 17 वर्षांचा आपला संसार सोडून दिला आहे. सध्या तो शिवानी दांडेकर हिच्या सोबत राहत आहे. अधुना भबानी हिच्याशी 2000 साली विवाह केला होता पण 2017 साली काही कारणास्तव ते दोघे वेगळे झाले. असे देखील म्हटले जाते ते दोघे लवकरच लग्न करणार आहेत.
सैफ अली खान – अमृता आणि सैफ अली खान यांनी देखील त्यांचा सुखी संसार जवळपास 13 वर्षांनंतर संपविला. सैफ टशन चित्रपटांचे शूटिंग करत होता. त्यावेळेस तो कारीनाच्या प्रेमात पडला. करीना सैफ पेक्षा खूप छोटी आहे. तरी देखील लग्नासाठी तयार झाली. सैफ आणि अमृता यांना दोन मुले आहेत. तर करीनाला देखील एक मुलगा आहे लवकरच ती दुसऱ्यांदा आई होणर आहे.
अर्जुन रामपाल – अर्जुन रामपाल हा एक उत्तम अभिनेता आहे. त्यांनी सुपर मॉडेल मेहर जेसिया हिच्याशी 1997 साली विवाह केला पण 2019 मध्ये हे दोघे विभक्त झाले. गैब्रिएला डेमेट्रिएडस हिच्याशी अर्जुन यांनी विवाह केला त्यांना आता एक मुलगा देखील आहे.
आमीर खान – आमीर खान देखील एक उत्तम अभिनेता आहे. तो उत्तम चित्रपट बनवितो. तो एक चांगला माणूस देखील आहे पण त्यांचे वैवाहिक जीवन खूप खडतर आहे. 1987 साली त्यांनी रिना दत्त यांच्याशी विवाह केला होता. पण त्यांचे देखील काही वाद झाल्यामुळे ते दोघे वेगळे झाले/ त्या नंतर लगाण चित्रपटाच्या वेळेस किरण राव आणि आमीर यांची ओळख झाली त्या नंतर त्या दोघांनी विवाह केलात्यांना आता एक मुलगा देखील आहे.
बोनी कपूर – बोनी कपूर यांनी देखील दोन विवाह केले होते. मोनि शोनी हिच्याशी आणि दूसरा श्रीदेवी हिच्याशी. बोनी जेव्हा श्री देवीला भेटले तेव्हा त्यांना त्यांचे खरे प्रेम भेटले असे जणू वाटले त्यांनी श्रीदेवी हिच्याशी लग्न केले. पण एक दुखांची गोष्ट म्हणजे आता बोनी यांच्या सोबत दोघी देखील नाहीत.धर्मेंद्र – धर्मेंद्र यांची गोष्टच वेगळी आहे. धर्मेंद्र हे चित्रपटात काम करण्याच्या अगोदरच त्यांचे लग्न झाले होते. पण त्यांना हेमामालिनी खूप आवडल्या. त्यांनी त्यांच्या पहिल्या बायकोला न सोडत हेमा यांच्याशी विवाह केला. हिंदू धर्मात दोन विवाह करण्यास परवानगी नसल्यामुळे त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला आणि हेमा यांच्याशी लग्न केले.